*दिनांक: ३० सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वा*
*आज ४७३ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ३८ हजार ८३८ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के*
*आज ४७ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

अहमदनगर (दि ३० सप्टेंबर २०२०) : जिल्ह्यात आज ४७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ८३८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३८४९ इतकी झाली आहे.

 बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २०, अकोले १२, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०४, पारनेर ०२, पाथर्डी ०१, शेवगाव ०२, श्रीगोंदा ०२, श्रीरामपूर ०२ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ४७३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १०२, अकोले ५२, जामखेड ३५, कर्जत १९,  कोपरगाव २३, नगर ग्रामीण २९, नेवासा २४, पारनेर १२, पाथर्डी २२,, राहाता ५०, राहुरी १२, संगमनेर २७, शेवगाव २२, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर १६, कॅंटोन्मेंट ०५, मिलिटरी हॉस्पिटल १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:३८८३८*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३८४९*
*मृत्यू:७०९*
*एकूण रूग्ण संख्या:४३३९६*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी*