
*दिनांक: २८ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वा*
*आज तब्बल ८५६ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ३७ हजारांचा टप्पा*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३३ टक्के*
*आज ५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ८५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३७ हजार ५३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३७९६ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३०, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०२, पारनेर ०३, संगमनेर ०४, शेवगाव ०१, श्रीगोंदा ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ८५६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २३५, अकोले ४२, जामखेड ४७, कर्जत २१, कोपरगाव ४३, नगर ग्रामीण ३९, नेवासा ३९, पारनेर ४४, पाथर्डी ३५, राहाता ५४, राहुरी ५४, संगमनेर ७४, शेवगाव २९, श्रीगोंदा २४, श्रीरामपूर ४२, कॅंटोन्मेंट ११, मिलिटरी हॉस्पिटल २१ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:३७५३१*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३७९६*
*मृत्यू:६८५*
*एकूण रूग्ण संख्या:४२०१२*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी*

