छाया : लहू दळवी

अहमदनगर (दि २३ नोव्हेंबर २०२०) : लॉकडाऊन काळातील वीज बिलाबाबत सवलत देण्याचे सरकारने जाहिर केले होते. मात्र, आता उर्जामंत्र्यांनी याबाबत जनतेची फसवणुक करत कोणतीही सवलत देता येणार नसल्याचे सांगून नागरिकांना पूर्ण बील भरावे लागेल, असे जाहिर केले. त्यामुळे आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नसून हे सरकार फसवे असल्याची टीका भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे यांनी केली.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, प्रा. भानुदास बेरड, उपमहापौर मालन ढोणे, महीला व बालकल्याण समिती सभापती लता शेळके, अ‍ॅड. विवेक नाईक, जगन्नाथ निंबाळकर, सुवेंद्र गांधी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, महेश नामदे, नगरसेवक रवींद्र बारस्कर, तुषार पोटे, बाळासाहेब कोतकर, अजय ढोणे, कालिंदी केसकर, रेखा मैड, संध्या पावसे, सुधा लाटे, नवनाथ टिमकरे, बाळासाहेब गायकवाड, सतिश शिंदे, सुजीत खरमाळे, लक्ष्मीकांत तिवारी, चंद्रकांत पाटोळे, अ‍ॅड. चंदन बारटक्के,नरेश चव्हाण, सचिन चोरडीया,पंकज जहागीरदार, वसंत राठोड,अविनाश साखला, मनोज ताठे, दत्ता गाडळकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी प्रा. बेरड म्हणाले,नगर जिल्ह्यात बिबट्या सारख्या नरभक्षक हिंस्त्र प्राण्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत आहे. दिवसा वीज पुरवठा होत नसल्याने शेतकर्‍यांना रात्रीच्या वेळी पीकांना पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागते. त्यामुळे अंधारात बिबटया हल्ला करतो. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागात दिवसा वीजपुरवठा करावा. राज्यातले सध्याचे आघाडी सरकार हे सर्वच बाबतीत अपयशी ठरलेले आहे. मंत्र्यांच्या बंगल्यांची बिले हे सरकार माफ करते, मात्र सर्वसामान्यात सरकारला स्वारस्य नाही. ही मोठी शोकांतीका आहे.