मुंबई – सिद्धिविनायक मंदिरात उद्या सकाळी ११ वाजता ढोल ताशे वाजवत आणि गुलाल उधळत वाजत गाजत नाचत दर्शनाला जाणार. महाराष्ट्र सरकारचा जनतेच्या दबावामुळे दारुण पराभव आणि महाराष्ट्र जनतेचा मोठा विजय झाला आहे.

जल्लोष साजरा करणार असल्याचे भाजप नेते राम कदम यांनी म्हटले आहे.भाजपने मंदिरं उघडण्यासाठी सिद्धिविनायक मंदिरातच आंदोलन केले होते. तसेच महाराष्ट्रातील मंदिरे लवकरात लवकर उघडा, अशी मागणी मनसेनेही केली होती.

तर दिवाळीनंतर प्रार्थना स्थळ उघडली जातील,असे संकेत ठाकरे सरकारने दिले होते. दरम्यान आता शनिवारी झालेल्या निर्णयानुसार राज्यातील मंदिरे,मशीद,चर्च,गुरूद्वारा आणि सर्वच प्रार्थना स्थळ उद्यापासून म्हणजेच सोमवारपासून उघडली जाणार आहेत. कोरोना संकट आणि लॉकडाउनच्या ८ महिन्यांनंतर प्रार्थना स्थळ खुली होणार आहेत