
*दिनांक: ०६ नोव्हेंबर २०२०, सायंकाळी ६-३० वाजता*
*आतापर्यंत ५५ हजार २८७ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.९३ टक्के*
*आज १७८ रुग्णांना डिस्चार्ज तर २६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर : जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार २८७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरूवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १४६१ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत १६५ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २४, अकोले १३, कोपर गाव ०३, नगर ग्रामीण ०४, संगमनेर ०१, श्रीगोंदा ०२, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ०३, कर्जत ०२, नगर ग्रामीण ०८, नेवासा ०१,पारनेर ०१, राहाता ०२, राहुरी ०५, संगमनेर ०९, शेवगाव ०१, श्रीरामपूर ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज १६५ जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा १९, अकोले १३, जामखेड ०७, कर्जत ११, कोपरगाव ०३,नगर ग्रामीण ०२, नेवासा २०, पारनेर ०४, पाथर्डी २०, राहाता ०८, राहुरी ०४, संगमनेर २४, शेवगाव १५, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्येमनपा ३१, अकोले १५, जामखेड ०९, कर्जत ०९, कोपरगाव ०६, नगर ग्रा.१६, नेवासा ०६, पारनेर ०४, पाथर्डी २०, राहाता ०८, राहुरी ०४, संगमनेर १४, शेवगाव २०, श्रीगोंदा ०९, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट ०१ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
