
*दिनांक: १४ ऑक्टोबर, २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल*
*आज तब्बल ९५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ४८ हजार २५४ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.९३ टक्के*
*अहमदनगर*: जिल्ह्यात आज तब्बल ९५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४८ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.९३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या २३३२ इतकी आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १८३, अकोले ५६, जामखेड ३२, कर्जत ३४, कोपरगाव ३०, नगर ग्रा. ५८, नेवासा ४५, पारनेर २५, पाथर्डी ४५, राहाता ८२, राहुरी ७२, संगमनेर १८१, शेवगाव १८, श्रीगोंदा २९, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल १६ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
