
दिनांक: ०३ ऑक्टोबर, २०२० रात्री ७ वा*
*बरे झालेल्या रुग्ण संख्येने ओलांडला ४१ हजारांचा टप्पा*
*आतापर्यंत ४१ हजार ७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.२६ टक्के*
*आज ७५८ रुग्णांना डिस्चार्ज तर ४८१ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर (दि ३ ऑक्टोबर २०२०) : जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४८१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६९९ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ४२, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७७ आणि अँटीजेन चाचणीत ३६२ रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२,अकोले ०१, जामखेड ०४, नगर ग्रामीण ०३, नेवासा ०१,पारनेर ०१, राहाता ०१, श्रीगोंदा ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ७७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ३०, कर्जत ०१, कोपरगाव ०२, नगर ग्रामीण ०४, नेवासा ०२, पारनेर ०१, पाथर्डी ०३, राहाता ०२, राहुरी ०९, संगमनेर १९, शेवगाव ०३, श्रीरामपूर ०१,अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज ३६२ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १६, अकोले ४४, जामखेड ३०, कर्जत १७, कोपरगाव १८, नेवासा २७, पारनेर १२, पाथर्डी ३९, राहाता ४९, राहुरी १५, संगमनेर २९, शेवगाव २७, श्रीगोंदा १७,, श्रीरामपूर २२ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ७५८ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १७०, अकोले ३३, जामखेड २९, कर्जत २२, कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
