*दिनांक: ०३ ऑक्टोबर, २०२० दुपारी १२ वाजेपर्यंत अहवाल*
*आज ७५८ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज*
*आतापर्यंत ४१ हजार ७५ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.२० टक्के*
*आज १४ बाधितांची रुग्णसंख्येत भर*

*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ७५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४१ हजार ७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत १४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३२३७ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०७, जामखेड ०४, नगर ग्रामीण ०१, राहाता ०१, श्रीगोंदा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७५८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १७०, अकोले ३३, जामखेड २९, कर्जत २२,  कोपरगाव ३९, नगर ग्रामीण ८०, नेवासा ४९, पारनेर ३३, पाथर्डी ४१, राहाता ४४, राहुरी २४, संगमनेर ६३, शेवगाव ४०, श्रीगोंदा २६, श्रीरामपूर ४८, कॅंटोन्मेंट ०३, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या:४१०७५*
*उपचार सुरू असलेले रूग्ण:३२३७*
*मृत्यू:७२७*
*एकूण रूग्ण संख्या:४५०३९*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*


*घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी*