
*दिनांक: २० सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल*
*आज ३८० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज*
*आतापर्यंत ३१ हजार ५७१ रुग्ण बरे होऊन परतले घरी*
*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.३४ टक्के*
*आज ३३ बाधितांची रुग्णसंख्येत भर*
अहमदनगर (दिनांक: २० सप्टेंबर २०२०) : जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.३४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९८५ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २२, संगमनेर ०१, नगर ग्रामीण ०१, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले ०२, शेवगाव ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज ३८० रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ६०, संगमनेर ०८, राहाता ३८, पाथर्डी १६, नगर ग्रा २२, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा ४१, पारनेर ३२, अकोले १२, राहुरी ३१, शेवगाव ३९, कोपरगाव २४, जामखेड २२, कर्जत २८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.
