कोरोनाच्या संकटामुळं विधीमंडळात साधेपणाने शपथविधी पार

कोरोना महामारीच्या महाभयंकर संकट काळात एकीकडे महाराष्ट्रच्या हितासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या जनतेशी लॉक डाउन बाबत संवाद साधत होते जनतेला धीर देत महाविकास आघाडीचं सरकार आपल्या पाठीशी खम्बिर असल्याचे आश्वासन देत होते तर दुसरीकडे विरोधक त्यांचे पाय खेचण्याचे राजकारण करत असल्याचे दिसत होते कारण होते मुख्यमंत्री आमदार नसल्याचे आणि त्यासाठी विरोधकांनी सर्व प्रकारचे राजकारण करत कोरोना आणि संकटकाळ न पाहता राजकारण केले आणि सर्व साम दाम दण्ड करत सत्तेपोटी धडपड करतांना दिसले आणि शेवटी अयशस्वी झाले आणि आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध आमदार झाले.

राज्यात ९ विधानपरिषदेच्या जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली होती. ही निवडणूक बिनविरोध झाली. कोरोनाच्या संकटामुळं विधीमंडळात साधेपणाने हा शपथविधी पार पडलादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच इतर आठ आमदारांनी देखील शपथ घेतली. यामध्ये शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे, भाजप चे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड यांच्यासह राष्ट्रवादी चे आमदार शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आणि काँग्रेस चे आमदार राजेश राठोड उपस्थित होते.

या शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, शिवसेना खासदार अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते.