
कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याबाबत आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेकडून तसे घोषित केले जाते. त्यामुळे महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही- आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे
राज्यात रुग्णांची संख्या वाढते, मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होऊन त्यांना घरी देखील सोडण्यात येत आहे.सध्या १२० रुग्णांना डिस्चार्ज. मुंबईतील धारावी भागात लॉक डाउन प्रभावीपणे राबविण्याची आवश्यकता. डिस्टंसिन्ग पाळण्यासाठी पोलिसांनी कडक भूमिका घ्यावी- आरोग्यमंत्री

सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक
जास्त रुग्ण आढळून येत असलेल्या मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरांमध्ये नागरिकांना मास्क वापरणे बंधनकारक करावे. मुंबई महापालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक केल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती.

राज्य शासनाकडून डॉक्टरांना सुरक्षेची आवश्यक साधने पुरविण्यात येणार-आरोग्यमंत्री

राज्यात ‘इंडियन मेडिकल असोशिएशन’च्यावतीने तालुका स्तरावर ‘रक्षक’ क्लिनिक व मोठ्या शहरांमध्ये मोबाईल क्लिनिक सुरू करण्यात येणार. या क्लिनिकमध्ये ओपीडी सुरू करण्यात येईल. राज्य शासनाकडून डॉक्टरांना सुरक्षेची आवश्यक साधने पुरविण्यात येणार- आरोग्यमंत्री

